Wednesday, December 17, 2008

प्रेमाचा अधिकार

प्रेमाचा अधिकार
कधी काळी होता
तेव्हा चूक केली
आणि फक्त पश्चातापच उरला
कर्तव्याचा संसारसुरु झाला पण,
विस्मरण झाले की
आता प्रेमाचा अधिकार
उरला नाही आपल्यापाशी
जपावे घरकुल
सांभाळावा संसार
तेच विश्व झाले माझे...
थोडेसे स्थिरावलो संसारात अन्
परत एकदा,
हृदयातील प्रेमाला एक कोवळा
अंकुर फुटला
नकळतच
तसेही प्रेम कोणी ठरवून करत नाही
पण हळू हळू
त्या प्रेमांकुराचे रोपटे झाले
अन्
एकदम भानावर आलो
हे काय करत आहोत आपण?
स्वतःलाच प्रश्न विचारला
हृदय नको म्हणत होते
पण मन घट्ट करणे आवश्यक होते
उखडले ते रोपटे
आणि भिरकावून दिले जनसागरात
आता ते रोपटे शिव्याशाप देत आहे
देणारच
का देऊ नये?
मोठ्या वृक्षाचे स्वप्न अस्तित्त्वात येण्याअगोदरच
एका प्रेमळ रोपट्याचा अंत झाला होता
उद्या दुसरी जमीन मिळेलही
त्या रोपट्याला
पण प्रेमाचा तो ओलावा?
तो कुठे मिळणार?
पाणी कुठेही मिळेल त्या रोपट्याला
पण त्या पाण्यातून मिळणारे प्रेम मात्र आटले
नव्हे आटवावे लागले
दुसरा पर्याय नव्हता
खरेच नव्हता....
काय करु मी तरी?
एकाच वेळी दोन स्वप्नांत कसा जगू?
कोणतेतरी एक स्वप्न खरे होणार ना?
दोन्ही स्वप्ने खरी होऊ शकतात का?
आजतरी मला हृदयावर दगड ठेवणे भाग आहे
परत एकदा प्रेमाचा अंकुर जन्म घेऊ नये
ही काळजी घेणे भाग आहे
नाहीतर एका घरकुलाच्या वृक्षाची
आहुती पडेल
स्वतःशीच बजावले
कर्तव्यापोटी मनाला समजावणे
हेच आता हाती उरले....
- सागर

Wednesday, July 9, 2008

जरा अपनाके तो देखिये हमे |

इतने भी क्या खफां हो हमसे
के आप हमे दोस्त मानते नहीं
जरा अपनाके तो देखिये हमे
शायद जिंदगीभर आप साथ छोडेंगे नही

- (कधी कधी शायर असलेला) सागर

Friday, May 23, 2008

एवढी दया नको रे दाखवू...

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले
त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता....
खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

हे देवा,
एकच मागणे तुझिया चरणी
एवढी दया नको रे दाखवू...

होवोत अजुनि स्फोट, वाहोत अश्रूंचे लोट
मरो कुणाचा बाप, मरो कुणाची आई
जोपर्यंत स्वत:चा आत्मा जळत नाही
तोपर्यंत मुर्दाड लोकांना कसली आहे घाई?

स्वतःची मुलगी पडलेली असेल
प्रेतांच्या ढिगार्‍यात बेवारशी
स्वतःच्या रक्ताचे वाहणारे पाट दिसेल
तरच धमनी फुगेन जराशी

धावा-मारा हा गोंधळ ऐन वेळी कशाला?
शेजारी अतिरेकी उभा केला
तेव्हा का बेसावध राहिला?
तुमच्या तळतळाटाने का तो मेला?

तुमच्या रक्ताचे पाणी करुन
सीमेपार तो गेला
उंच्या हॉटेलात उंची खाना खाऊन
त्याच्याच मस्तीत तो जिरुन गेला

आभाळ फाटले ते आपले,
काळीज कापले गेले ते आपले
तो 'अफजल्या' रोज ज्या रोट्या तोडतो
त्यासाठी पैसे खिशातले गेले ते आपले

म्हणूनच म्हणतो रे देवा, एवढी दया नको रे दाखवू...
होऊन देत अजून काही स्फोट.....
कधीतरी रक्तात अंगार फुलेल, डोळ्यांत रक्त उतरेन...
अवघा भारत एक होईन, तेव्हा मात्र पानिपत अतिरेक्यांचे होईन.....
(भारताचे उज्वल भवितव्याचे स्वप्न उरी असलेला...)- सागर

Tuesday, March 25, 2008

सरिता

सरिता येथे सागरमय होते

सर्वस्व अर्पून प्रेमा करता...

अथांग सागरात काहूर माजते

एकेक दिशा सावरता सावरता....
(अथांग) सागर

Thursday, February 14, 2008

का अधर तुझे हे थरथरले ...

प्रेमधारांत चिंब भिजवुनि मजला
का नयन तुझे हे लाजले....
ओढ याच दिसाची तुजला
का अधर तुझे हे थरथरले ...
- सागर

व्हेलेंटाईन डे स्पेशल

वर्षाव प्रेमाचा आज व्हावा
असा दिवस हा अति खास व्हावा
बघुनि आपले प्रेम ते ...
स्वर्गातुनि व्हेलेंटाईन संत तो अवतरावा ....
- सागर

Thursday, February 7, 2008

तुझ्या भावनांची शपथ आहे

तुझ्या भावनांची शपथ आहे
नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही

आज तू मला रोखले आहे
नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही

आज तुझा आधार आहे
नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही

म्हणूनच सखे, आपला संग आहे
तुझ्या असण्याची मला किंमत आहे
नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ...

- सागर०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.