Friday, May 23, 2008

एवढी दया नको रे दाखवू...

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले
त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता....
खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

हे देवा,
एकच मागणे तुझिया चरणी
एवढी दया नको रे दाखवू...

होवोत अजुनि स्फोट, वाहोत अश्रूंचे लोट
मरो कुणाचा बाप, मरो कुणाची आई
जोपर्यंत स्वत:चा आत्मा जळत नाही
तोपर्यंत मुर्दाड लोकांना कसली आहे घाई?

स्वतःची मुलगी पडलेली असेल
प्रेतांच्या ढिगार्‍यात बेवारशी
स्वतःच्या रक्ताचे वाहणारे पाट दिसेल
तरच धमनी फुगेन जराशी

धावा-मारा हा गोंधळ ऐन वेळी कशाला?
शेजारी अतिरेकी उभा केला
तेव्हा का बेसावध राहिला?
तुमच्या तळतळाटाने का तो मेला?

तुमच्या रक्ताचे पाणी करुन
सीमेपार तो गेला
उंच्या हॉटेलात उंची खाना खाऊन
त्याच्याच मस्तीत तो जिरुन गेला

आभाळ फाटले ते आपले,
काळीज कापले गेले ते आपले
तो 'अफजल्या' रोज ज्या रोट्या तोडतो
त्यासाठी पैसे खिशातले गेले ते आपले

म्हणूनच म्हणतो रे देवा, एवढी दया नको रे दाखवू...
होऊन देत अजून काही स्फोट.....
कधीतरी रक्तात अंगार फुलेल, डोळ्यांत रक्त उतरेन...
अवघा भारत एक होईन, तेव्हा मात्र पानिपत अतिरेक्यांचे होईन.....
(भारताचे उज्वल भवितव्याचे स्वप्न उरी असलेला...)- सागर

2 comments:

Anonymous said...

Tumchya kavita atirekyannach vachayla dilya pahijet!!

सागर भंडारे said...

Dhanyavad Anamik pratikriye baddal. Tumache naav kalale asate tar chan zale asate