Thursday, April 30, 2009

-- माझ्या काही चारोळ्या --

आठवणींच्या गर्तेत बुडणे
हे प्रेमवीरांचे स्वप्न असते
तुझ्या नेत्रकटाक्षांनी घायाळ होणे
हेच आमच्या नशीबी असते -१-

दोन मनांचे मिलन होणे
हे घर उभारणे असते
एकमेकांना सावरत जगणे
हे घर टिकवणे असते -२-

एके काळी ती मनात होती
आणि जग नव्हते
आता जग आहे
आणि ती मनात नाहिये... -३-


कोळ्याचे विखुरलेले धागे विणणे
जसे अविश्रांत चालू असते
आमचे तुटलेले धागे गोळा करणे
तसे अविरत चालू असते - ४ -

तू माझी होणं
वाटलं तितकं सोपं नव्हतं
तुला नजरेत भरणं
एवढंच माझ्या हातात उरलं होतं - ५ -

सापानं अंडी गिळल्यावर
पक्ष्यानं आक्रोश करणंच बाकी उरतं
तू दुसर्‍याची झाल्यावर
आसवं टिपणंच माझ्या हाती उरतं ... - ६ -

नियती दाराशी आल्यावर मी म्हणालो
छे छे , हा माझा वृथा भ्रम आहे
नियतीही चकीत झाली नि म्हणाली
हा तर स्वप्नांच्या मागे धावणारा मनुष्य आहे - ७ -

राखेतून उठून भरारी मारणं
हे जसं फिनिक्स पक्ष्याचं वैशिष्ट्य आहे
तसं मला जिवंतपणी मरण देणं
प्रिये! हे तुझं वैशिष्ट्य आहे... - ८ -

पूर्वेची तांबडफुटी पाहताना
भान हरपायला होतं
तसं प्रिये तुला पाहताना
मला जग विसरायला होतं - ९ -
- सागर

2 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

दोन मनांचे मिलन होणे
हे घर उभारणे असते
एकमेकांना सावरत जगणे
हे घर टिकवणे असते -२-


Mast aahe!

Anonymous said...

Again nice poem.........
U r really great
(Manisha)