Monday, August 26, 2024

चांगली कविता लिहिण्याचे बेसिक तंत्र


कविता लिहिताना शब्दांवर लक्ष दिले की आशय गडबडतो.
आशय सशक्त हवा. तो आधी आपल्या मनासारखा लिहून काढावा. 
ती कविता उस्फुर्त असते. त्या कवितेला नंतर शब्द बदलून आकार द्यावा. पण आशय हरवणार नाही याची काळजी घ्यावी. मग. निर्माण होणाऱ्या रचना खूप सुंदर होतात.
पुढे पुढे आशयाला समर्पक शब्द देखील सुचत जातात..

उदाहरणार्थ 
मुसळधार पावसात पसरलेला हा गारवा 
जणू प्रेमाच्या रसातला शिडकावा

यात मुसळधार पाऊस गारवा आणतो तर प्रेमात भिजलेल्याला शिडकावा हे तृप्ततेचे प्रतीक म्हणून वापरले आहे..

ही ओळ शब्दांत बांधायचा प्रयत्न करू आशय न हरवता.

मुसळधार पाऊस नि त्यातला हा गोड गारवा
जणू प्रेमरसात चिंब ओला करणारा शिडकावा 


मी काही उत्तम कवी नाही. पण आशय लक्षात घ्यावा म्हणून हे उदाहरण उस्फूर्तपणे सुचले तसे दिले. 🙂🙏🏻